
मुंबई : होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केली आहे. एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
"संदीप देशपांडे राजकारणात उशीरा आले आहेत. ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्षे ओळखतो. त्यामुळे काय होणार आणि काय होणार नाही हे माझ्याइतके कुणालाच माहिती नाही. राजकारणात माणसाने कायम संयमी आणि आशावादी असले पाहिजे. काही लोकांना अजून त्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राजकारणात नुसता उथळपणा करून चालत नाही," अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
यावर संदीप देशपांडे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, " होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?" असा सवाल त्यांनी राऊतांचे नाव न घेता केला.